Home ठळक बातम्या मतदानासाठी येत्या 20 मे रोजी ठाणे जिल्ह्यात सर्व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर;...

मतदानासाठी येत्या 20 मे रोजी ठाणे जिल्ह्यात सर्व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

ठाणे दि.12 मे :
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी खासगी आणि शासकीय अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नूसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यामध्ये 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे असे तीन लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या तिन्ही मतदारसंघामध्ये येत्या सोमवारी 20 मे रोजी 5 व्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या मतदारसंघांच्या मतदारयादीत समाविष्ट प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे.

या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना सोमवारी 20 मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश शर्ती/अटीस अधीन राहून दिले आहेत.

अशा आहेत या आदेशातील अटी – शर्थी…
1) हा आदेश शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे.

2) ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांना धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही.

3) या आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे 135 ब (2) नुसार कारवाईस पात्र राहतील.

4) हा आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणाऱ्या परंतु ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदारयादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा