Home ठळक बातम्या डोंबिवलीसाठी ५८५ कोटींची स्वतंत्र पाणी योजना; शहाड पाणीपुरवठा योजना होणार पुनर्जीवित

डोंबिवलीसाठी ५८५ कोटींची स्वतंत्र पाणी योजना; शहाड पाणीपुरवठा योजना होणार पुनर्जीवित

खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

डोंबिवली दि.21 सप्टेंबर :
बारवी पाणी पुरवठा योजनेवरील वाढती मागणीमुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्राकरीता कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील – परिसरातील ग्राहकाच्या अपु-या पाणी पुरवठयाच्या तक्रारी वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर कल्याण – डोंबिवली शहरातील काही भाग, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र आणि आसपासच्या भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी शहाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात येत असून यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ५८५ कोटी रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत जलवाहिनी टाकण्याबरोबरच विविध कामे केली जाणार आहेत. या योजनेच्या पुनर्जीवनासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या विभागातील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे.(585 crore independent water scheme for Dombivli; Shahad water supply scheme to be revived)

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातुन मतदारसंघातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. याच पद्धतीने कल्याण, डोंबिवली, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी राज्याचा पाणी पुरवठा विभाग, एमआयडीसी यांच्या समवेत सातत्याने बैठका घेऊन वाढीव पाणी पुरवठ्याची मागणी केली होती. यामागणीनुसार कल्याण डोंबिवली शहराला वाढीव पाणी पुरवठा देखील मिळाला आहे. मात्र यापुढेही जाऊन नागरिकांना अधिक दाबाने मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेले काही वर्ष बंद असलेली शहाड पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरु करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शहाड येथे १८० द. ल ली. प्रति दिन क्षमतेची शहाड पाणी पुरवठा योजना सन १९६६ पासून तीन टप्यात बांधण्यात आली होती.

या योजनेतून उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली तसेस डोंबिवली औधोगिक क्षेत्र साठी पाणी पुरवठा करण्यात येत होता. बारवी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्यावर कालांतराने शहाड पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा फक्त उल्हास नगर शहरासाठी सीमित करण्यात आला आहे. शहाड पाणी पुरवठा योजनेतून सध्या १२० द.ल.ली. प्रतिदिन पाणी पुरवठा केला जातो. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील व आजुबाजुच्या रहीवाशी वसाहतीची पाण्याची कमतरता पाहता शहाड पाणी पुरवठा योजनेतील १८० द.ल.ली. प्रतिदिन ची पूर्ण क्षमता वापरुन ५० द.ल.ली. प्रतिदिन डोंबिवली औद्यागिक क्षेत्राकरीता पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित होते . त्याप्रमाणे शहाड पाणी पुरवठा योजना चा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांचे प्रयत्न होते. यात त्यांना यश मिळाले असून शहाड पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात येत असून यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ५८५ कोटी रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची मुबलक पाण्याची तहान मिटणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डोंबिवीतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणाार आहे. तर या निर्णयाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

या ५८५ कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रात २५०० घ.मी. क्षमतेची शुद्ध पाण्याची नवीन साठवण टाकीवरील उदंचन केंद्र तेथून ५० द.ल.ली. प्रतिदिन पाणी पुरवठा करण्याकरीता नवीन पंपींग मशीन बसविण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर हाऊस आणि पंप हाऊस चे दुरीस्तीकरण – मजबुतीकरण करणे, फिल्टरमधील बॅकवॉशचे अशुद्ध पाणी शुद्ध करण्याकरीता नवीन केंद्र बसविणे, जॅकवेल, उदंचन केंद्र – जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील रस्त्यांच्ये दुरूस्ती करून डांबरीकरण करणे आणि यासाठी विविध ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा